पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागतो, महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आपली इथे भेट झाली नाही. काही कारणांमुळे अजुनही थोडा वेळ तुमच्याकडून मागून घेत आहे; तोवर मी स्टार माझासाठी लिहिलेला एक ब्लॉग देत आहे. २००८ मधील मुंबई हल्ल्याच्यावेळी हा ब्लॉग लिहीला होता, त्यावेळची परिस्थिती कणभरही बदलली नाही हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईलच.
– – – –
गेले काही ब्लॉग आपली बऱ्यापैकी ओळख झालीय तेव्हा आपल्याच माणसांपासून काय लपवायचं? तुम्ही कोणाला सांगणार नाही अशी खात्रीय मला म्हणून फक्त तुम्हालाच सांगतोय,
(जानेवारी २००९)
पाकिस्तान घाबरले…
३०-४० मोस्ट वाँटेड अतिरेकी भारताच्या ताब्यात…