सकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाऊन मिनिटभर शांत उभा राहून आलो. हातात जे होतं त्यातल सोपं म्हणा हवं तर ते काम केलं. मनात अनेक विचार सुरुच होते.
१२० कोटी जनता, १ लाख लोकांमागे फार फार तर १२५ पोलिस…
७,५०० किलोमीटर सागरी किनारा, त्याच्या संरक्षणासाठी फारफार तर १०० पॅट्रोल बोटी..
अमेरिकेनं पाच वर्षापूर्वी एका संरक्षण विषयक अहवालात भारताला जगातील सर्वात जास्त अतिरेकीग्रस्त देशात स्थान दिलं होतं, या अहवालानुसार, भारतात २००७ या एका वर्षात वेगवेगळ्या अतिरेकी कारवायांमध्ये प्राण गमवावा लागणाऱ्या नागरिकांची संख्या होती २ हजार ३००…
१९९३ च्या स्फोटांपासून मुंबईवर किमान ८ अतिरेकी हल्ले झाले आहेत, ज्यात शेकडो निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला; हजारो निष्पाप जीवांना त्या जखमा घेऊन कसेबसे जगावं लागतंय. २६ नोव्हेंबरचा हल्ला सोडला तर बाकी प्रत्येक वेळी बाँब ठेवणारे किंवा रिमोट दाबणारे हात; कित्येक दिवस आपल्या आजुबाजुला, याच समाजामधे वावरत होते; अजूनही राहात असतील ही बाब जास्त अस्वस्थ करते. Continue reading