‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३’ (National Food Security Act) लवकरच देशात लागू होईल. आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणाही होईल. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हैराण झालेली काँग्रेस आणि युपीए-२ अन्न सुरक्षेकडे ‘गेम चेंजर’ म्हणून पाहात आहे. जगातील दर ८ माणसांमागे १ माणूस रोज उपाशीपोटी झोपतो, त्यात भारताचा वाटा मोठा. जगात जे गरीब आहेत त्यातले २५ टक्के गरीब एकट्या भारतात आहेत. त्यामुळे अन्न सुरक्षा महत्वाची आहेच.
मतपेटीचा मार्ग गरीबाच्या पोटातून जातो हे याआधी अनेकदा सिद्ध झालंय त्यामुळेच काँग्रेसला घाई झालेली आहे. गरीबाच्या एक वेळच्या जेवणाची सोय करायची आणि बदल्यात मिळालंच तर त्याचं मत मिळवायचं असं काँग्रेसचं साधं गणित. स्वार्थ आणि परमार्थ साधण्याची संधी. जगातला पहिलाच कदाचित एकमेव प्रयोग. Continue reading