नमस्कार, रोज काहीतरी लिहायचं असं ठरवत होतो.
नेहेमीप्रमाणे विचारातच अनेक दिवस- महिने गेले.
उशीरा का असेना सुरुवात तर होतेय याचा आनंद.
लिहायचं काम असेल तर मुळचा आळशी स्वभाव जास्तच डोकं वर काढतो, त्यावर मात करत दिसामाजी काहीतरी लिहण्याचं आव्हान आहेच बघुयात कसं जमतंय ते…
रोज प्रचंड वेगानं घडणाऱ्या, आपल्या कानावर येऊन आदळणाऱ्या घटना,
शेती, ट्रेक, खेळ, मला भेटलेली-कळलेली-न कळलेली माणसं यावर लिहिणार आहे.
इथे जे मनाला भावेल-खटकेल ते प्रामाणिकपणे लिहायचा प्रयत्न करणार हे नक्की.
हा देश ‘कृषी प्रधान’ आहे असे आपण गर्वाने म्हणतो, पण वास्तव फार भयंकर आहे. येथील शेतकरी आत्महत्या करतोय आणि व्यापारी ऐश करतोय..! हे चित्र बदलायला हवे.
sandeep .i will be correcting you. write wchich you cant in your proffessional media. Being honest doesnt make any sense either you write what you see, understand or what u cant express. But anyway all the Best for non farm writting.